11:11 AM

gf

fgg

12:19 AM

हरिश्चंद्रगड




पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटाची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिरवरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे. मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे.

कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.

पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. येथे पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सोयीचे आहे.

मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते.

हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.

हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.

12:09 AM

अखंड सावधान असावें




नारायण सूर्याजीपंत ठोसर या नावाच्या मुलाचे लग्न ठरले होते. तत्कालीन रिवाजाप्रमाणे मुलगा दहा-बारा वर्षांचा होता. लग्नाचे विधी सुरू झाले. मुलासमोर अंतरपाट धरला गेला. मुलीला आणून उभे केले. मंगलाष्टके सुरु झाली आणि मंगलाष्टकातील 'शुभमंगल सावधान' हे शब्द ऐकताच तो बारा वर्षांचा मुलगा एकदम 'सावध' झाला आणि या भरल्या लग्नमंडपातूनच त्याने धूम ठोकली. त्याला सांसारिक प्रपंचात रस नव्हता. विश्वाचा प्रपंच आपण करावा, अशी ओढ त्याला अगदी कोवळ्या बालपणातच लागलेली होती. या ओढीने त्याला लग्नमंडपातून खेचून नेले. त्याच्या हातून तपश्चर्या घडली. अनुष्ठाने घडली आणि तो मुलगा श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणून जगाला ज्ञात झाला.

विवाहमंडपात ऐकलेले 'सावधान' हे शब्द अवधान म्हणजे लक्ष आणि सावधान म्हणजे लक्षपूर्वक हा अर्थ त्याने मनाच्या गाभार्‍यात इतका जपून ठेवला की सावधानतेची शिकवणूक आयुष्यभर विविध प्रसंगी या मुलाने महाराष्ट्राला दिली. 'सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळ मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षिले नवजे' मोक्ष मिळवावयाचा असेल तर, सावध, साक्षेपी आणि दक्ष राहाणे आवश्यक आहे. हे समर्थ परखडपणे सांगतात. 'सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयाशी साधन सायास करणेचि न लगे' असा समर्थांचा स्वानुभवपूर्ण निर्वाळा आहे. समर्थ स्वत: तर सावधानपणे वागलेच पण या महाराष्ट्रालाही त्यांनी सावधानतेचा मंत्र दिला.

समर्थानी रूढ अर्थाने संसाराचा त्याग केला होता. पण त्यांच्याजवळ जी कुबडी होती तिच्यात गुप्ती दडवलेली असे. ही त्यांच्या अखंड सावधानतेची एक प्रकारे निशाणी होय आणि त्यांचे हे सावधानपण सगळ्या ठिकाणी होते. खबरदारी आणि वेगी तेणे सामर्थ्य चढे अंगी असा उपदेश समर्थांनी केला आहे. आणि 'इशारतीचे बोलू नये बोलायाचे लिहू नये लिहावयाचे सांगू नये जबाबीनें असे व्यवहाराचे शाश्वत सूत्रही पुढल्या पिढीसाठी शब्दबद्ध करून ठेवले आहे. प्रपंचातही हे सावधानपण किती आवश्यक असते ते सांगताना समर्थ म्हणतात, सावधानपणे प्रपंच केला तेणें सुखचि पावला दीर्घ प्रयत्ने मांडला कार्यभाग साधे आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा असा नव्या पिढीला आदेश देतांना 'विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाचि करणे' या शब्दात सावधपणे वागण्याची आवश्यकता समर्थांनी प्रतिपादिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाल्यानंतर समर्थांनी संभाजी महाराजांना ज्या पत्राद्वारे उपदेश केला त्या पत्राचा प्रारंभच मुळी 'अखंड सावधान असावें दुश्चित कदापि नसावें तजवीजा करीत बसावें एकंत स्थळीं' 'अखंड सावधान असावे' असा सल्ला किंवा उपदेश जो समर्थांनी दिला होता तो दुर्लक्षित झाल्यामुळेच की काय संभाजी महाराजांना एका दुष्ट कारस्थानाला बळी पडावे लागले आणि या तडफदार, शूर आणि कर्तबगार राजाला महाराष्ट्राला मुकावे लागले.

3:11 AM




जोगवा या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट्र राष्ट्रीय चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यामुळे जोगवा या प्रकाराविषयी एक कुतूहल लोकमानसात निर्माण झाले आहे. जोगवा या चित्रपटाआधी याच विषयावर 'झुलवा` हे नाटक रंगभूमीवर आले आणि त्या नाटकाच्या आगेमागे 'गिध` हा स्मिता पाटील, नाना पाटेकर अभिनित हिंदी चित्रपट पडद्यावर झळकला होता. यल्लम्माचे उपासक जोगते आणि जोगतिणी यांच्या दर्दभर्‍या जीवनाची कहाणी चित्रीत करणारा 'कथा नाम्या जोग्याची` हा चित्रपट देखील मराठी पडद्यावर झळकला. एकूणच यल्लम्माच्या या उपासकांकडे आणि यल्लम्माच्या उपासनेतील अनिष्ट प्रथांकडे समाजातील सर्जनशील वर्ग डोळसपणे पाहू लागल्याचे हे चिन्ह आहे. जोगते किंवा जोगतिणी डोळसपणे पाहू लागल्याचे हे चिन्ह आहे. जोगते किंवा जोगतिणी या अनुक्रमे देवदास आणि देवदासी वर्गात मोडत असल्या तरी देवदासी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतर यल्लम्माला मुले किंवा मुली सोडण्याची अनिष्ट प्रथा पूर्णपणे बंद झालेली आहे असे नव्हे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित, अशिक्षित किंवा अल्पशिक्षित, श्रद्धेच्या किंवा अंधश्रद्धेच्या ओझ्याखाली वावरणार्‍या समाजात अजूनही देवदासी परंपरा सुरू आहे. या परंपरेचा अधिक्षेप चैतन्य महाप्रभू, बसवेश्वर, शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर, संत एकनाथ, संत तुकाराम या व अशा अनेक संतांनी केलेला असला तरी ही प्रथा सुरूच आहे.

जोगवा या शब्दाचा भारतीय संस्कृतीकोषात दिलेला अर्थ असा -
''महाराष्ट्रातील देवीचे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालून कपाळी भंडार लावून आणि हाती परडी घेऊन देवीच्या नावाने जी भिक्षा मागतात, तिला जोगवा असे म्हणतात. विशिष्ट आधि-व्याधींच्या निरसनासाठी अथवा इच्छित कामनांच्या पूर्तीसाठी इतर लोकही नवसाने मंगळवारी, शुक्रवारी किवा नवरात्रात जोगवा मागतात. ज्यांच्या घरी देवीचा कुळधर्म असतो, त्यांना कुळधर्माचा एक भाग म्हणून जोगवा मागावा लागतो. नवसाने जोगवा मागणार्‍यांत स्त्रियांची संख्या अधिक असते.``

जोगते व जोगतिणी या प्रथेतील एक उपासक. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदी शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो. जोगवा हा त्यातील एक. मुख्य म्हणजे जोगवा हा नृत्यप्रकार नाही तर संत एकनाथांचे भारूड आहे. ते भारूड असे -


अनादि निर्गुण प्रगटली भवानी।
मोहमहिषासुर मर्दनालागुनी।।
त्रिविध तापांची कराया झाडणी।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणीं।।
आईचा जोगवा जोगवा मागेन।
व्दैत सारूनी माळ मी घालीन।।
हातीं बोधाचा झेंडा घेईन।
भेदरहित वारीसी जाईन।।
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा।
करूनी पीटीं मागेन ज्ञानपुत्रा।।


या भारूडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत. याबरोबरच भवानी आईचा रोडगा ही प्रसिद्ध आहे.

सत्वर पावगे मला। भवानीआई रोडगा वाहिन तुला।।१।।
सासरा माझा गांवी गेला। तिकडेच खपवी त्याला।।२।।
सासू माझी जाच करती। लवकर निर्दाळ तिला।।३।।
जाऊ माझी फडफड बोलती। बोडकी करगं तिला।।४।।
नणंदेचें पोर किरकिर करितें। खरूज होऊंदे त्याला।।५।।
दादला मारून आहुती देईन। मोकळी करगे मला।।६।।
एकाजनार्दनी सगळेंचि जाऊंदे। एकटीच राहूंदे मला।।७।।


मराठी लोकधर्मात जोगवा हा एक उपासनाप्रकार म्हणून रूढ असला तरी सद्यकालिन समाजाने या उपासना प्रकाराला लोकनृत्य म्हणून नामाभिधान दिले आहे. जोगवा या परंपरेतील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी समाजाच्या तळातील थरापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन पोहोचला पाहिजे. समाजातील जाणत्या वर्गाने या संदर्भात कळ सोसली पाहिजे कारण डोक्याच्या केसांची जट कापणे सोपे आहे पण अनिष्ट रूढींच्या प्रभावाखाली असणार्‍या मनाची जट कापायला पिढ्यांची मानसिकता जावी लागेल.

6:37 AM

3:34 AM




लेण्याद्रीचा गणपती उंच डोंगरात आहे. उंच डोंगरातल्या कुशीत खोदलेल्या लेण्यांमध्ये या गणपतीचे देऊळ आहे. दक्षिणाभिमुख असलेल्या या लेण्यांपर्यंत जायला सुमारे तीनशे पाय-या चढाव्या लागतात. पण , या पाय-या चढणे हादेखील एक छान अनुभव असतो.

मुळात या बुद्धकालिन अठरा लेण्या आहेत. त्यातल्या आठव्या गुहेत हे मंदिर आहे. त्यालाच गणेश - लेणी असेही म्हणतात. एकाच दगडात हे मंदिर घडवलेले आहे. या मंदिराचा सभामंडप पाहताना आपण थक्क होतो. ५३ फूट लांब , ५१ फूट रुंद आणि सात फूट उंच असेलल्या या सभामंडपला कुठेही पिलर नाहीत.
दक्षिणाभिमुख असलेली या मंदिरातली गिरिजात्मजाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. अष्टविनायकांच्या इतर गणपतींपेक्षा ही मूर्ती थोडी वेगळी आहे. कोरलेली मूर्ती असल्याने ती तितकीशी सुबक दिसत नाही. आजही या मंदिरात लाइट नाहीत. ज्या काळात हे मंदिर बांधले गेले त्याकाळात त्याची रचनाच अशी होती की , या मूर्तीवरच सरळ सुर्यकिरणे येतात.

लेण्यांशेजारीच गोड पाण्याचं टाकं आहे. हे पाणी स्वच्छ आणि थंड असतं. लेण्यांची व्यवस्था पुरातत्व खात्याकडे आहे. जुन्नरचे सरपंच देशपांडे हे देवालयाचे सरपंच आहेत.
लेण्यांकडे जाण्याचा रस्ता तसा फारसा खडतर नाही. पण नेहमी पाय-या चढताना वाटेत काही झाडे , सावली किंवा थांबण्याची सोय असते. अशी कोणतीही सोय लेण्याद्री चढताना उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊनच लेण्याद्री चढायची वेळ ठरवून ध्यावी , शक्यतो पहाटे किंवा दुपारी चार नंतर म्हणजेच उन्हे उतरल्यावर चढायला सुरवात करावी.

जशी इथे झाडे , सावली यांची सोय नाही तशीच या लेण्यांच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचीही सोय नाही. म्हणून इथे जाताना बरोबर खाण्या-पिण्याचे पदार्थ घेऊनच जावेत , असं मी सांगेन.

लेण्याद्रीचा गणपती तर सुंदर आहेच , तितकाच या भागाच्या आसपासचा परिसरही सुंदर आहे. या आसपासच्या परिसरात शिवनेरीचा किल्ला आहे. चावंडचा किल्ला , पूरचं कुकडेश्वर मंदिर आहे. त्याशिवाय जीवधान किल्ला , हडसर किल्ला हेदेखील इथून जवळच आहे. इथून तुम्ही सहजपणे नारायणगावलाही भेट देऊ शकता. तिथे आर्वीचं उपग्रह दळणवळण केंद्र , खोडदची रेडिओ दुर्बीण अशी अनेक ठिकाणे भेटी देण्यासारखी आहेत. म्हणूनच लेण्याद्रीच्या गणपतीला बेट द्यायला जाताना चार-पाच दिवसांची सवड काढूनच जायला हवे. त्यामुळे गणपतीचे दर्शन तर होऊलच , पण आजूबाजूचा निसर्गाने नटलेला हा नितांतसुंदर परिसरही पाहून होईल. आर्वीच्या दुर्बीणीसह अनेक नव्या गोष्टींशी ओळख होईल. द-याखो-यात रमणा-यांसाठी तर जीवधन , हडसर हे किल्ले आहेतच. म्हणूनच हा गणपती जरा तब्येतीत पाहा.

जुन्नर तालुक्यातलं लेण्याद्री जायला मुंबई-कल्याण ओतुरमार्गे सुमारे १७९ किमी आहे. पुणे- जुन्नर किंवा तळेगाव जुन्नर एस.टीने जाऊन तिथून पुढे बसने किंवा वाहनाने लेण्याद्रीला जाता येतं. राहण्याची आणि जेवण्याची जुन्नर आणि परिसरात होऊ शकते.

3:28 AM

भिमाशंकर




भगवान शंकराचं मुख्य स्थान हिमालयातील कैलास जरी असलं तरी पश्चिम घाटाच्या डोंगररांगाही त्याला प्रिय आहेत. सह्यादीतल्या अशा कितीतरी सुरम्य... दाट रानांनी वेढलेल्या ठिकाणी त्याच्या वास्तव्याच्या जागा आहेत. या दुर्गम जागांच्या भोवती परंपरेने अनेक कथा गुंफलेल्या आहेत. अशीच एक पौराणिक कथा... एका अरण्यात भीमक नावाचा राजा उग्र तप करत होता. त्याच्या तपावर श्रीशंकर प्रसन्न झाले व त्यांनी राजाला दर्शन दिलं. त्या वेळी शिवाच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या. राजाने त्या धारांची नदी होऊ दे. अशी शिवाजवळ प्रार्थना केली. शिवाने ' तथास्तु ' म्हटलं... आणि भीमेचा उगम झाला. स्थळाला नाव पडलं... भिमाशंकर.

इथल्या संपन्न निसर्ग... घनदाट जंगल... भरपूर कोसळणारा पर्जन्य... मेघांनी वेढलेला आसमंत... साहजिकच परिसर मंतरलेला. मनातली देवाची कल्पना वृद्धिंगत करणारा... त्यातच शंकराचं बारा ज्योतिलिंगापैकी एक देऊळ... यामुळे मराठी श्रद्धाळू मनाचा ओढा इथे पूवीर्पासून आहे. Bhimashankar भिमाशंकरला रस्त्याने जायला पुणेनगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मंुबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी एवढं आहे. पुण्याहून भिमाशंकर 168 किमी आहे. मंुबईहून जायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड , माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचं. पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगाव मागेर् मंचरला वळायचं. दुसरा मार्ग म्हणजे मंुबई-पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्याने राजगुरूनगर मागेर् मंचर गाठायचं. मंचर-भिमाशंकर हे अंतर साधारण 70 किमी असून मार्ग दाट जंगलाचा व निर्जन आहे. पावसाळ्यात या भागात प्रचंड धुकं असतं. Bhimashankar कोकणातून भिमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचा वळण आहे. खांडसहून भिमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील वर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर मिळतात. एक मार्ग ' गणपतीघाट ' या नावाने ओळखला जातो. हा रस्ता थोडा वळण घेऊन जाणारा (ञ्जह्मड्ड 1 द्गह्मह्यद्ग) असला तरी अतिशय निधोर्क आहे. दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगरभटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. पहिल्या पठारावर जाणारा हा मार्ग एका उभ्या कड्याच्या कपारींमध्ये काढलेल्या असल्याने पावसाळ्यात पूर्णपणे निसरडा होतो व बहुतेक टप्पे दरीच्या बाजूने असल्याने द्ग 3 श्चश्ाह्यद्गस्त्र आहेत. असं जरी असलं तरी नेहमीच्या सराईत भटक्यांना या साहसी मार्गाने जाण्याची ओढ असते. तरुणांच्या सहज प्रवृत्तीप्रमाणे त्यांना थरार अनुभवायला आवडतोच. पण जरा जपूनच गेलं पाहिजे. Bhimashankar या पठारावर वाटेपासून थोडादूर पदरचा किल्ला आहे. याला ' कलावंतीणीचा महाल ' असंही म्हणतात. या डोंगररांगेच्या वातावरणात खूपच गारवा असतो. त्यातच वरती घाटावर भन्नाट वारादेखील असतो. त्यामुळे आपल्या सॅकमधले सगळे कपडे प्लास्टिकमध्ये चकाडबंद केलेले असावेत. रात्री काढलेले बूट सकाळी घालताना मात्र तपासूनच घालावेत. कारण जंगल दाट असल्याने व बाहेरच्या गारव्यामुळे किडीकिरडू तुमच्या उबदार बुटांचा आश्रय घेण्याची दाट शक्यता आहे. हा भाग दुर्गम असल्याने वीजदेखील अनेक वेळा जाते. त्यामुळे सोबत उत्तम विजेचीर व मेणबत्या ठेवाव्यात. सगळा ट्रेक दाट रानातून जात असल्याने मळलेल्या वाटेव्यतिरिक्त गुरांच्या अनेक वाटा आहेत. या वाटांवर भरकटण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे खांडसहून स्थानिक माणूस घेणं अत्यावश्यक आहे. खांडराहून कर्जतला जाणारी शेवटची बस संध्याकाळी चारला असल्याने परतीचा प्रवास लवकर सुरू करावा. Bhimashankar मंदिराच्या अगदी शेवटपर्यंत बस जाते. मंदिर थोडं खालच्या बाजूला असल्याने पाच मिनिटं दगडी पायऱ्या उतराव्या लागतात. मंदिराची बांधणी साधी असून गाभारा मोठा आहे. मंदिरासमोर भल्यामोठ्या दगडी खांबांना लटकवलेली प्रचंड घंटा आहे. देवळाच्या आजूबाजूला पुजारयांच्या घरांतून राहण्या- जेवण्याची उत्तम व्यवस्था होते. तसंच आजूबाजूच्या धर्मशाळा व खानावळी आहेत. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची व्यवस्था या जागेपासून पाच सात मिनिटांवर आहे. या समृद्ध जंगलात... अभयारण्यात विविध प्रकारचे वन्यजीवन आहे. इथे आढळणारी भली मोठी खार... शेकरू... विशेष प्रसिद्ध आहे. तिथल्या अरण्यात नाना प्रकारच्या औषधी वनस्पती मिळतात. पावसाळ्यात रात्री चमचमणाऱ्या वनस्पतीदेखील आहेत. ग्रुप जर मोठा असेल व जंगलात फिरायची आवड असेल तर इथे भटकायला खूप मजा आहे. सोळा सतरा किमीवर असलेल्या अहुपे या गावापर्यंतचे जंगल अनेक अदूत गोष्टींनी भरलेले आहे. या पठारावरून समोरची माथेरानची डोंगररांग , गोरख , मच्छिंदचे सुळके , हरिश्चंदगड , नाण्याचा अंगठा... असा विशाल परिसर नजरेत येतो. Bhimashankar तर अशा निसर्गाचे भव्य रूप असलेल्या भिमाशंकरचा फेरफटका अंर्तमनाला असीम शांततेची अनुभूती देणारा... तरुणांच्या सळसळत्या चैतन्याला वाव देणारा...